शनिवार, १९ डिसेंबर, २०१५

असंघटित कामगांरासाठी महामंडळ स्थापन करा 

बंजारा नाका कामगार संघटनेचे राज्यव्यापी जनजागफती अभियान मंगळवारी मानखुर्द येथील नाक्यावर पोहोचले. त्यावेळी नाका कामगारांना मार्गदर्शन करून माहिती देताना महाराष्ट्र गाडियालोहार  घिसाडी महासंघाचे राष्ट्रीय संघटक मंगेश सोळंखे, हिरासिंग चव्हाण, ज्योतीराम चव्हाण  आदी.

मुंबई, ठाण्यातील नाका कामगारांची सरकारकडे मागणी
मुंबई / प्रतिनिधी
राज्यातील असंघटित आणि बांधकाम, नाका कामगारांच्या नोंदणीसाठी 90 दिवसांची अट पूर्ण करताना केणताही बिल्डर आणि बांधकाम कंपन्या कामगारांना सहकार्य करत नाहीत. यामुळे मागील दोन वर्षात मुंबई आणि परिसरातील रोज लाखेंच्या संख्येने नाका कामगार म्हणून काम करत असलेल्या कामगारांची सरकारदरबारी नोंद हेत नसून त्यामुळे राज्यात लाखोंच्या संख्येने असलेल्या नाका कामगारांना कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ मिळत नाही. यामुळे ही अट शिथिल करून ती 40 दिवसांची करावी आणि बांधकाम, नाका कामगारांसाठी राष्ट्रसंत सेवालाल महाराज यांच्या नावाने नाका आणि असंघटित कामगारांचे स्वतंत्र कामगार महामंडळ स्थापन करावे, अशी मागणी मुंबईतील बांधकाम, नाका कामगारांकडून करण्यात आली आहे.
मागील दहा वर्षापासून राज्यातील बांधकाम, नाका कामगारांमध्ये आपल्या हक्कांची जाणीव करून देण्यासाठी जनजागफती अभियान राबवणाऱया बंजारा नाका कामगार संघटनेकडून 1 डिसेंबर 2015 ते 3 जानेवारी 2016 या दरम्यान राज्यव्यापी जनजागफती अभियान राबवले जात आहे. या अभियानाच्या माध्यमातून राज्यासह मुंबई, ठाणे, या परिसरातील असलेल्या सुमारे 350 हून अधिक बांधकाम कामगारांच्या नाक्या-नाक्यांवर जाऊन कामगारांमध्ये जनजागफती अभियान राबवले जात आहे. मंगळवारी मानखूर्द पश्चिमेला असलेल्या बांधकाम कामगारांच्या नाक्यावर जनजागफती करण्यात आली. यावेळी बंजारा नाका
कामगार संघटनेच्या प्रमुख प्रतिनिधींसोबतच महाराष्ट्र गाडिया लोहार घिसाडी महासंघाचे राष्ट्रीय संघटक मंगेश सोळंखे यांनी यावेळी नाका कामगारांना मार्गदर्शन  करून त्यांचे प्रश्न जाणून घेतले. यावेळी नाका कामगार हिराबाई राठोड, कमळबाई राठोड आदींनी राज्यातील असंघटीत नाका कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी सरकारकडून तात्काळ राष्ट्रसंत सेवालाल महाराज यांच्या नावे असंघटीत कामगारांचे महामंडळ स्थापन करावे अशी मागणी केली. तर सीताबाई राठोड, सुशिलाबाई चव्हाण या मागील अनेक वर्षांपासून नाका कामगार म्हणून काम करत असताना आत्तापर्यंत सरकारकडून त्यांची नोंद करणे दूरच परंतु कोणत्याही योजनेचा लाभ आपल्याला मिळाला नसल्याची माहिती दिली. तर यावेळी मंगेश सोळंखे यांनी सरकारकडे असंघटीत कामगारांच्या सर्वांगिण विकासासाठी सुमारे तीन हजार कोटी रूपये जमा असतानाही अनेक प्रकारच्या नोंदणीसाठीच्या जाचक अटींमुळे नाका कामगार मोठय़ा प्रमाणात सरकारी योजनांपासून उपेक्षित राहिले असल्याने याविरोधात सरकारला जाब विचारण्यासाठी बंजारा नाका कामगार संघटना, महाराष्ट्र गाडियालोहार  घिसाडी महासंघाच्या माध्यमातून हे राज्यव्यापी जनजागरण अभियान राबवले जात असल्याची माहिती नाका कामगारांना दिली. नाका कामगारांमध्ये जनजागफती करण्यासाठी मुंबई ठाणे आणि रायगड परिसरात असलेल्या  नाक्या-नाक्यांवर जाऊन त्यांच्यात जनजागफती केली जात असल्याची माहिती बंजारा नाका कामगार संघटनेचे प्रमुख ऍड. नरेश राठोड यांनी दिली.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा